1 minute reading time (77 words)

[TV9 Marathi]'दुर्दैवाने संसदेचे दिवस कमीत कमी होत चाललेत,राज्याच्या हिताची चर्चा नाही'

'दुर्दैवाने संसदेचे दिवस कमीत कमी होत चाललेत,राज्याच्या हिताची चर्चा नाही'

खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनावर चिंता व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असतानाही राज्याच्या हिताच्या चर्चांवर भर दिला जात नसल्याचे त्यांनी म्हटले. संसदेचे दिवस कमी होत चालले असून गोंधळ, आरोप-प्रत्यारोपातच वेळ वाया जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिला सुरक्षा, हवामानातील बदल, प्रदूषण, राज्याची आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणुकीसारख्या गंभीर विषयांवर अधिवेशनात अपेक्षित चर्चा झाली नाही, असे सुळे यांनी नमूद केले. विरोधी पक्षाने उपस्थित केलेले मुद्दे सत्ताधाऱ्यांनी सकारात्मकतेने घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

[TV9 Marathi]'साहेबांनी मुख्यमंत्री असताना महिला आ...
[Navshakti]'संसदेत राज्याच्या हिताची चर्चा नाही'